Sunday, December 25, 2016

९० दिवसाचा इंटर्नशिप उपक्रमाने विद्यार्थीना मिळाले नवीन आत्मविश्वासाचे बळ


राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाल विभागाने पत्रकारितेच्या विद्यार्थांसाठी ३ महिन्याच्या अभिनव इंटर्नशिप  उपक्रमाला सुरूवात करून राज्यातील पत्रकारितेच्या विद्यार्थांना नवे आत्मविश्वासाचे बळ दिल आहे. या आंतरवासिता करित असताना   माहिती व जनसंपर्क महासंचालनाल एक कर्मचारी म्हणून काम करण्याची मनमोकळी संधीही विभागा कडुन देण्यात आली. त्याबद्दल  मी, मनापूर्वक सर्व आंतरवासियाच्या वतीने विभागच्या आभार मानतो.
                                                                                                                     मी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आंतरवासियाच्या जाहिरात वाचली आणि थेट मी गावातून सरळ मुंबई गाठली. माझा सारख्या एका ग्रामीण भागातील विद्यार्थीला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागा कडून मिळालेल्या प्रतिसाद बघून मी, फार भाराऊन गेले होते. कारण माझा साठी मुंबई काही नवीनच कल्पना होती. मी या मायावी नगरी आणि मंत्रालय याबद्दल  फक्त टीव्ही आणि वृत्तपत्रात पाहले व वाचले होते.  ते पण मला प्रत्येक्षात  या ९० दिवसाच्या इंटर्नशिप  करते वेळी अनुभवता आले.  माझा इंटर्शिपच्या पहिला दिवसा पासून तर शेवटच्या दिवसापर्यत मला एक गोष्ट खूप मनाला भिडली ती म्हणजे महासंचालक सरांनी  आम्हाला म्हणले की तुम्ही  इंटर्शिप विद्यार्थी म्हणून नाही तर एक विभागच्या कर्मचारीच आहेस असे. त्यांचे हे उद्गार आज पण आम्हा विद्यार्थीच्या प्रतेक्श आत्मविश्वास वाढवत आहे. माझा या तीन महिन्याच्या इंटर्शिप  मध्ये मला  माहिती व जनसंपर्क या कार्यालया आंतरवासिता करते वेळी शासनाच्या बारकाईने प्रसिद्धीचे काम मला पाहता आले. सत्तच्या कामाच्या तान याविभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या वर असतो.  कारण शासनाच्या प्रसिद्धी विभाग अनुकल प्रसिद्धी साठी प्रामाणिक हे सर्व कर्मचारी दुमतीने कार्य करत असता.  याची एक बारीक चूक म्हणजे ''शासनाची बारिक चुक " अशीच सर्व़त्र मानली जाते  . पण या विभातील सर्व पदाधिकारी बिनचूक ही कामे  करित  असतात.  माझा 3 महिन्याच्या आंतरवासिता करित असतानी मला प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे  माहिती व जनसंपर्क  संचालक आणि पदाधिकारी आम्हा विध्यार्थाना  लेख लिहण्यासाठी सत्त प्रोत्सान देण्याचे काम त्यांनी  केले. ऐवढेच नव्हे तर आमचे लेख चेक करूण त्यात दुरस्ती करण्याचे सूचना आणि नवनव्या कल्पना ही त्यांनी सुचवल्या.

                मित्रानो आज सांगताना ऐवढा आनंद होतो की,या विभागातील सर्वच अधिकारी यांनी जे तीन महिन्यात प्रेम दिले त्यानी आज मी नव्ह तर इंटर्नशिपच्या प्रत्येक विधार्थी भाराउुन गेले होते. कारण आम्हाला शाषनाच काम म्हणजे असे फक्त खुडच्या तोडने असेच गावी  ऐकले होते. पण आज हे प्रत्येक्षपणे  व व्यक्तीगत हे सर्व काम पाहल्या नंतर शासनाच्या कामाची वास्तविक परिस्थिती कडली. आज शासनाचे काम हे जवाबदारीचे आहे त्यासाठी त्यांना  प्रत्येक वेळी अलर्ट राहावे लागते.  हे तर या ९० दिवसाच्या इंटरशिप मध्ये कळलेच .  पण त्याच बरोबर मोठ्या अधिकारी बरोबर शासनाचे प्रसिद्धीचे काम करण्याचा उत्कृष्ट अनुभव आम्हाला लाभला. हा अनुभव आम्हाला आमच्या पुढच्या वाटचालीत नक्कीच कामात येईल.पत्रकारितेतील विद्यार्थी शिक्षण पुर्ण करूण जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्यात कौशल्य नसल्यामुळे किवा अनूभव नसल्याने त्याना नौकरी मिळत नसते त्यावेळी विद्यार्थीना नौकरी साठी भटकती करावी लागते. पण राज्यसरकारच्या वतिने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात घेण्यात येणाऱ्या आंतरवासिता उपक्रमाने आमच्यसारख्या नवशिक्षित विद्यार्थीना एक व्यास पिठ मिळालेले आहे. आणि यातील घेतलेला अनुभवाने आम्हा  विद्यार्थाना  नोकरी मिळविण्यासाठी एक सजीवनीचे काम करित आहे. त्याच बरोबर आज तंत्रज्ञानाचे जग आहे त्यामुळे बदलत्या काळानुसार शासनाचे प्रसिद्धीचे  क्षेत्र पण खूप बदल घडून आलेला आहे . त्या साठी सुध्या महाराष्ट्र शासानाच्या वतीने मनुष्यबळ विकासासाठी कौशल्य विकासाच्या एक भागच म्हणून अश्या प्रकारच्या इंटर्नशिप  हा उपक्रम सुरु करण्यात आले आहे. यामुळे वि़द्यार्थीना  याच्या भविष्यात  नक्कीच फायदा होणार आहे. 

 

No comments:

Post a Comment